ग्रंथालयांचं आता भवितव्य काय? - उज्ज्वल आहे!!
ग्रंथालय म्हणजेच वाचनालयांनी आपल्या महाराष्ट्राच्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक जीवनाला पुस्तकांच्या, विचारांच्या जवळ ठेवले आणि त्यामुळेच महाराष्ट्र हा कायमच देशात आपले अग्रस्थान राखू शकले. गेल्या काही वर्षांत आलेल्या स्थित्यंतरांमुळे आता महाराष्ट्र ज्यातून घडला अशा ग्रंथालयांचे, पर्यायाने येथील वाचनसंस्कृतीचे काय होणार अशी शंका सर्वांच्या मनात डोकावू लागली. याच विषयाचा समग्र अभ्यास केलेल्या आणि वाचनचळवळीशी जवळचं नातं असणारे प्रसाद मिरासदार यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि त्यातून पुढं आलं एक आगळी शक्यता... महाराष्ट्रातील ग्रंथालयांचं भवितव्य काय असू शकतं! पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं ऐकालयाच हवा, असा हा खास पॉडकास्ट!